ह्दविकाराचे वाढते प्रमाण चिंताजनक
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील वाढते औद्योगिकरणामुळे चेहरामोहरा बदलत चालला असल्याचे दिसत आहे. परंतु त्याच बरोबर वाढती धूळ आणि दूषित वायूमुळे उरणकरांचे जीवनमान दिवसेंदिवस संकटमय बनत चालले आहे. त्यात वाढत्या थंडीमुळे शरीरातील रक्त पुरवठा अकुंचित पावत असल्याने व इतर आजारही जोर करीत असल्याने प्रतिकार शक्ती कमी होत चालली आहे. तसेच आपल्या शरीराची हालचाल कमी झाली आहे. यामुळे उरण परिसरात गेली अनेक महिन्यापासून हार्ट अटॅकने मृत्यू होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तरी यावर आत करण्यासाठी व्यस्त जीवनातून काही वेळ आपली प्रकृती जपण्यासाठी देणे आवश्यक बनले आहे.
सद्यपरिस्थिती व्यस्त जीवनामध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. त्यामध्ये खूप कमी वयातील लोकांना हल्ली हार्ट अटॅकमध्ये मृत्यू झाल्याचे आपण ऐकत आहोत. याला सध्याची व्यस्त जीवनशैलीच प्रमुख कारण आहे. या व्यस्त जीवनामुळे ब्लुडप्रेशर, मधुमेह, तणाव युक्त लाइफ, स्ट्रेसफुल जॉब, जंक फूड, धुम्रपानचे वाढते प्रमाण, आरामाची जीवन शैली, पायी न चालता गाड्यांचा वापर, केमिलयुक्त खाद्यपदार्थ खाणे, व्यायामाची कमी, वेळीअवेळी जेवण, रात्रीचे जागरण आणि एकटेपणा त्याचबरोबर आजकाल बरीच लोक घरचे जेवण सोडून बाहेरील खाणे जास्त पसंद करत आहे अशा खाण्यामुळे कॉलेस्टोलचे प्रणाम वाढून हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
नियमित तपासणी आवश्यक
यापासून दूर रहाण्यासाठी कमी तेल, कमी मीठ कमीत कमी फास्ट फूड खायला पाहिजे. दोन वेळचे घरचे जेवण वेळेवर करणे, हिरव्या पालेभाज्या, फ्रुट सलाद यांचे सेवन जास्त केले पाहिजे. वेळो वेळी आपले रक्तदाब आणि शुगर कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे. नियमित डॉक्टरकडे जावून चेकअप करणे जरुरीचे आहे.
किमान रोज 1 तास तरी व्यायाम कारणे गरजेचे आहे. त्यामध्ये चालणे, पोहणे, योगा प्राणायाम यापैकी काही दररोज व्यायाम करू शकता. रोज सकाळी 60 मिनीट ब्रिस्क वॉकिंग सर्वात उत्तम, तणावमुक्त रहाणे खूप गरजेचे आहे. यासाठी मित्र मंडळी, फॅमिली सोबत वेळ घालवणे, ट्रिप वर जाणे, गेट टुगेदर करणे, ट्रेक वर जाणे ह्या सर्व वातावरणात आपला ताणतणाव दूर होतो.
डॉ. सत्या ठाकरे
सेक्रेटरी, उरण डॉक्टर वेलफेअर