कारचा व रिक्षाचा भीषण अपघात

| मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबईतील वर्सोवा बीचवर एका भरधार कारचा व रिक्षाचा भीषण अपघात झाला. यात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गणेश यादव असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. निखिल जावळे आणि शुभम डोंगरी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version