नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नावं दिले जावे, अशी आग्रही मागणी नामांतरण कृती समितीने सरकारकडे केलेली आहे. या संदर्भात नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या व्यापक बैठकीत हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. नामांतरण झाल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचा संकल्पही कृती समितीने केलेला आहे. पुढील आंदोलनाची दिशाही 13 जानेवारीला दिबांच्या जयंतीनिमित्त एक मेळावा आयोजित केला जाणार आहे.त्याची रुपरेषा 1 जानेवारीला जाहीर केली जाणार आहे.त्यासाठी विभागावर बैठकांचे सत्र पुन्हा सुरु करुन सरकारचे लक्ष वेधण्याचे ठरविण्यात आले.