। मुंबई । वृत्तसंस्था ।
ऐन थंडीच्या हंगात राज्यातली थंडी गायब झाली आहे. याचे कारण म्हणले नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.राज्यात आणखी 4 ते 5 दिवस पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या अवकाळी पावसाने राज्यात धुमशान घातल्याने द्राक्ष, स्ट्रॉबेरी, आंबा- काजू शेतकरी हवालदिल झाले आहेत.