स्त्रियांच्या श्रमाचे मूल्यमापन होण्याची गरज

खोपोली । प्रतिनिधी ।
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध कामांची जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक व गांभीर्याने पार पाडणार्‍या स्त्रिया कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत हातभात लावतात तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतही योगदान देतात परंतु त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने स्त्रियांच्या श्रमाचे मूल्यमापन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने यांनी केले.
सह्याद्री सामाजिक संस्था, सद्भाव फाउंडेशन, मानवसेवा विकास संस्था व बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कर्जत तालुक्यातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर, कर्तबगार महिलांचा सत्कार सोहळा व महिला बचत गट सदस्यांना विविध शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन पोसरी जवळील चंद्रभागा फॉर्म येथे करण्यात आले होते. व्यासपीठावर अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक कुशाल तितरे, दंत शल्यचिकित्सक डॉ. प्रियंका तुपे -म्हापणकर, कृषी अधिकारी चिंतामण लोहकरे, सह्याद्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अशोक तुपे, सद् भाव फौंडेशनच्या समन्वयक सुनंदा लाड, मंडळ अधिकारी भगवान बुरुड, तलाठी अश्‍विनी भामरे, तलाठी जयश्री मोरे उपस्थित होते.

Exit mobile version