टक्केवारी खाणाऱ्यांना चपराक बसली- आ.जयंत पाटील

| अलिबाग | प्रतिनिधी |

ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप व इंडिया आघाडीने घवघवीत यश मिळवले. अलिबागसह अनेक ग्रामपंचायत मध्ये घवघवीत यश मिळाले आहे. हा विजय आपल्या सर्वांचा आहे. प्रचंड मतांनी उमेदवार निवडून आले. सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. 10-15 टक्केवारी खाणाऱ्यांना मतदारांनी चपराक बसवली आहे, असे आमदार जयंत पाटील म्हणाले.


यावेळी माजी आमदार पंडीत पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, खानावचे विजेते सरपंच उमेदवार अजय नाईक, निलेश गायकर, बेलोशीचे सरपंच कृष्णा भोपी, पंचायत समिती माजी सदस्य श्रीधर भोपी, पिंट्या ठाकूर आदी इंडियाच्या आघाडीचे व शेकापचे कार्यकर्ते, उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते .

शेकाप भवन समोर जल्लोष
ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप व इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावागावातून कार्यकर्ते शेकाप भवनकडे निघाले. सकाळी अकरा वाजल्यापासून कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली. ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह तरुण कार्यकर्ते शेकाप भवन समोर जमले. जसजसा निकाल समजत होता. तसतसा कार्यकर्ते आनंदोत्सव शुभेच्छा देऊन साजरा करीत होते.
Exit mobile version