| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून चिपळूनमध्ये कॉलेजची संरक्षक भिंत ढासळल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. महाविद्यालयाच्या परिसरात घटनेची माहिती कळाल्यानंतर पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे. विद्यार्थी बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू केली असता भिंतीच्या ढिगार्याखाली या विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला. सुशांत घाणेकर असे मृत तरुणाचे नाव आहे. खेडमधील रहिवासी असलेला सुशांत घाणेकर चिपळूणमध्ये डीबीजे महाविद्यालयात शिक्षण घेत होता. ढिगार्याखाली सापडल्याने तरुणास रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे चिपळूण पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी सांगितले. या यंत्रणेमध्ये ज्यांचा दोष असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच यामध्ये जर हायवे प्रशासनाचा हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
पावसामुळे कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली, विद्यार्थ्यांचा मृत्यू
![](https://krushival.in/grygrars/2024/07/92f39847cda0fed27d40ac9469720d4d17208587058441063_original.avif)