ग्रामदेवतांच्या जत्रांचा थाटमाट

जुन्या रीतीभाती पाळूनच उत्सव साजरा, मुंबई, ठाणे ठिकाणावरही भाविकांची हजेरी

| पनवेल। प्रतिनिधी ।
चैता पाखाचे महिन्या मंदी नाग चाफ्याला भरू येती ग… अशी पारंपरिक लोकगीते जेव्हा कानावर पडताच जिल्ह्यातील ग्रामदेवतांच्या जत्रांचा थाटामाटात आगमनाला सुरुवात होत असून आजही जुन्या चालीरीती सांभाळत ग्रामदैवतेचा मान जोपासला जातोय.ढोल-ताशांचा गजर, नाच-गाण्यांची बहार आणि आलेल्या पाहुण्यांसहित तांदळाच्या भाकरी आणि झणझणीत मटणाच्या जेवणाचा बेत आजही या जत्रेचे आकर्षण आहे. आजही जुन्या रीतीभाती पाळूनच जत्रा उत्सव साजरा केला जातो. उरण-पनवेल तसेच जिल्ह्यातील तालुक्यात ग्रामदैवत तसेच कुलदैवतांच्या जत्रांना सुरुवात होते.

फुंडे येथील घुरबादेवीच्या यात्रेनंतर जसखार येथील रत्नेश्‍वरी, करंजा येथील द्रोणागिरी, नवीन शेवे येथील शांतेश्‍वरी, कोप्रोली तसेच या यात्रांमध्ये देवींच्या यात्रेसोबत कुलदैवतांच्याही यात्रा भरवल्या जात आहेत. यापैकी जसखार, करंजा तसेच नवीन शेवे या गावात देवींच्या यात्रा दोन दिवसांच्या असतात. यामध्ये एक दिवस यात्रा; तर दुसरा दिवस हा पालखी सोहळ्याचा असतो. या यात्रा व पालखी सोहळ्यांसाठी जिल्ह्यासह मुंबई, ठाणे आदी ठिकाणावरही भाविक येतात. तालुक्यातील बारा गावातील यात्रा एकाच दिवशी साजर्‍या केल्या जातात. यामध्ये गावातील गावदेवतांच्या या जत्रा होतात. या यात्रांमध्ये देवाला बोकडाचा मान देण्याची तसेच काठ्या नाचवण्याचीही प्रथा आहे.

चौकटहेलकोट काठीचा सोहळा जत्रेच्या पूर्वसंध्येला गावातून ढोल-ताशांच्या गजरात, मिरवणुकीत गावाच्या वेशीवर असलेल्या गावदेवीच्या देवळापर्यंत वाजतगाजत निशाण नेण्याची प्रथा आहे. या निशाणाला ङ्गहेलकोट काठीफ असे संबोधले जाते. हा एक 20 ते 30 फूट लांब बांबू असतो. त्या काठीला रंगीबेरंगी कापडाची रिबीन गुंडाळून वरच्या टोकाला मोरपीस व छोटी हातघंटी बांधलेली असते. त्या वेळी देवीला नैवेद्य सहाणेवर दाखवला जात असल्याने या विधीला सहाण भरणे असेदेखील म्हणतात.

Exit mobile version