राज्यात लवकरच होणार पोलीस भरती

। अहमदनगर । वृत्तसंस्था ।
राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे ही भरती पूर्ण झाली झाल्यानंतर लगेच 7 हजार 200 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये 5 हजार 200 पोलिसांची भरती करण्याचे काम पूर्वत्वाच्या दिशेने आहे, लेखी आणि शारिरीक परीक्षा झाल्या असून त्याची अंतिम यादी जाहीर करणं बाकी आहे. त्यानंतर आता 7 हजार 200 पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

Exit mobile version