राज्यात अजूनही पावसाची शक्यता

| पुणे | प्रतिनिधी |
मुंबईसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच काही ठिकाणी गारपीठ झाल्याने शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात पुणे हवामान विभागाचे प्रमुख केएस होसाळीकर यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. राज्यातील नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, पुणे, नागपूर मुंबई ठाणेसह काही भागात गेल्या 24 तासांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे, असे ते म्हणाले. पुढचे दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

Exit mobile version