। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अगामी टी-20 विश्वचषकाला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. आणि भारतीय संघ 5 जूनपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघ आयर्लंडशी भिडणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. यानंतर मेन इन ब्लूचा सामना 9 जूनला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. पण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कोणत्या संघासोबत मैदानात उतरणार हा एक मोठा प्रश्न आहे. कारण शुभमन गिल आणि केएल राहुलचा संघात समावेश केला नाही. याशिवाय रिंकू सिंगलाही संघात स्थान देण्यात आले नाही. दुसरीकडे, हार्दिक पांड्या अत्यंत खराब फॉर्ममध्ये झगडत असूनही त्याला विश्वचषकाच्या संघाचा भाग बनवण्यात आले आहे. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचे परफेक्ट प्लेइंग 11 कोणते असू शकतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
अगामी टी-20 विश्वचषकामध्ये विराट कोहली रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो. कोहलीने आयपीएलमध्ये डावाची सुरुवात केली आणि उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. त्याने 15 सामन्यांच्या 15 डावांमध्ये 741 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 5 अर्धशतके आणि 1 शतकही झळकावले. तसेच, सूर्यकुमार यादवला तिसर्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. यष्टिरक्षक फलंदाजाला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. ज्यामध्ये संजू सॅमसन आणि ऋषभ पंतच्या रूपाने 2 यष्टीरक्षकांचा समावेश आहे. पाचव्या क्रमांकावर शिवम दुबेवर सट्टा खेळू शकते. आयपीएलमध्ये त्याने 396 धावा केल्या आहेत. तर, रोहित शर्मा रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या या 2 अष्टपैलू खेळाडूंना संघात सामील करू शकतो. दोन्ही खेळाडू गोलंदाजीबरोबरच चांगली फलंदाजीही करू शकतात. मात्र, हार्दिकने आयपीएलमधील कामगिरीने सर्वांची निराशा केली आहे. भारतीय संघाचा फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव व युझवेंद्र चहल या जोडीवर अवलंबून राहू शकते. तसेच, वेगवान गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमराहच्या हाती असेल. मोहम्मद सिराज त्याला साथ देऊ शकतो.
अशी असेल भारताची बेस्ट इलेव्हन
![](https://krushival.in/grygrars/2024/05/rohit-4-e1716895330479-1024x527.jpg)