रायगड जिल्ह्यात तिघांचा बुडून मृत्यू

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात कर्जत, पनवेल, म्हसळा अशा तिघांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यात गेली पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिह्यात वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये तिघा जणांचा बुडून मृत्यू झालाआहे.
म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथील खाडीत मासेमारी साठी गेले असता खाडीत बोट उलटल्याने दोघेजण बुडाले यात एकजण बचावला. तर सर्वेश हरेश कोळी वय 42 हा बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
तर कर्जत तालुक्यातील पोशिर नदीत पोहायला गेलेल्या प्रमोद जगन जोशी वय 26 राहणार देवपाडा ता कर्जत हा नदीच्या मुख्य प्रवाहात सापडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. तसेच पनवेल तालुक्यातील पोयंजे पाली धरणात पोहायला गेलेल्या तिघांपैकी दीपक गंभीरसिंग ठाकूर 24 रा कलंबोळी याचा बुडाल्याने मृत्यु झाला.

Exit mobile version