क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चेन्नईत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी कांगारू संघाला 200 धावांत गुंडाळले. यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ गोलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमडलेली दिसत होती. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी रोहित शर्मासह टीम इंडियाच्या तीन फलंदाजांना खातेही उघडू दिले नाही.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियासाठी रोहित आणि ईशान सलामीला आले. रोहितने 6 चेंडूंचा सामना केला आणि तो शून्यावर बाद झाला. हेझलवूडने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इशान किशन पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. श्रेयस अय्यरने 3 चेंडूंचा सामना केला आणि तो शून्यावर बाद झाला. हेझलवूडनेही अय्यरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताच्या एकदिवसीय इतिहासात हे प्रथमच घडले आहे की तीन आघाडीचे फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत.







