चार जण गंभीर जखमी
। जळगाव । प्रतिनिधी ।
जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात बुधवारी (दि.7) रात्री भीषण अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.अपघातावेळी कारमध्ये सात जण असून ते उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघाले होते. मात्र या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेगावमधील सात मित्रांचा ग्रुप उज्जैन येथे दर्शनासाठी जात होता. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटातील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाला. तर इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातातील जखमींना सध्या जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. दरम्यान या अपघातादरम्यान चालक मद्यधुंद होता का? हा अपघात कसा झाला यासंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.






