तिलक वर्माचा पत्ता कट?

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना उद्या शुक्रवार, दि. 1 डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता रायपूर येथे खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत अजूनही 2-1 ने आघाडीवर आहे.

दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे चौथ्या सामन्यासाठी संघात बदल करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामध्ये श्रेयस अय्यर यासामन्यात पुनरागमन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे.त्यामुळे तिलक वर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. त्याला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही.

Exit mobile version