| चणेरा | प्रतिनिधी |
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जगातील सर्वात मोठ्या वृक्षारोपण महोत्सव मोहिमेत धाटाव औद्योगिक क्षेत्रातील डिएमसीसी कारखान्याने शासनाच्या ध्येय धोरणानुसार वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपकरणांतर्गत आपले रक्षण करण्यासाठी आणि परिसराला हिरवळ करण्यासाठी डीएमसीसी कंपनीने परिसरात 101 वृक्षांची लागवड गुरुवारी (दि.5) करण्यात आली. तर, सकाळी कंपनी परिसरात वृक्षारोपणाच्या घोषणा देत प्रभात फेरी देखील काढण्यात आली होती. यावेळी वृक्षांचे महत्त्व सांगण्यात आले असून आंबा, काजू, चिकू, फणस, बाहावा, करंज, गुलमोहर, कांचन, बांबु अशा प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
यावेळी डियमसीसी कंपनीचे साईट हेड किरण हिंगणे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात बोलताना सांगितले की, माणसाच्या जीवनात वृक्षाचे महत्व अधिक आहे. त्यामुळे सर्वांनी या वृक्षारोपण महोत्सव या उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग घेऊन वृक्षारोपण केले पाहिजे. प्रत्येक झाड हे ऑक्सीजन निर्मित कारखाना आहे. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावू तेवढा जास्त प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन मिळेल. खऱ्या अर्थाने जगाला जर हिरवेगार बनवायचे असेल आणि माणसाला दैनंदिन जीवनात ताजेतवाने व आनंदी राहायचे असेल तर वृक्ष लागवड केलीच पाहिजे, असे किरण हिंगणे यांनी परखड मत व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना कंपनीचे एच.आर. मॅनेजर अनिल जांभळे यांनी सांगितले की, आज कंपनीच्या परिसरात वरिष्ठांच्या आदेशानुसार 101 वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांची लागवड करत असताना ज्या पद्धतीने आम्ही लागवडीचे नियोजन केलेला आहे त्याच पद्धतीने त्या वृक्षाचे संगोपन जतन करण्याचे आम्ही नियोजन केलेला आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येकाने वृक्षाचे रोपण करून जबाबदारीने त्यांचा सांभाळ केला तर उद्या आपला परिसर निश्चितच हिरवा गार दिसेल, असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी सेफ्टी ऑफिसर अरुण माने, अकाउंट डिपार्टमेंटचे प्रभात पात्रो, मेडिकल ऑफिसर राकेश खांडेकर, निलेश शेंडगे, अनिकेत पाटील, संतोष सातपुते, अल्पेश बोय, स्मिता परातणे, कावेरी देशमुख यासह कंपनीचे विविध पदाधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होते.