दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

। श्रीनगर । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयनं मोठा कट आखल्याचे समजते. पुन्हा एकदा काश्मीर खोर्‍यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम झाली आहे. त्यामध्ये, दोन दशहतवाद्यांना कंठस्नान देण्यात आलं आहे.

काश्मीर खोर्‍यातील पुलवामा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांसोबत भारतीय सैन्य दलाच्या जवानांची धुमश्‍चक्री झाली आहे. त्यामध्ये जवानांकडून दोन दशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सैन्यातील अधिकार्‍यांनी दिली. अद्याप या दहशतवाद्यांची ओळख पटली नाही. मात्र, जवानांकडून अजूनही शोधमोहीम सुरूच आहे. पाकिस्तानी एलईटी कमांडर एैयाज उर्फ अबू हुरैरासह दोन स्थानिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले.काश्मीर खोर्‍यात सातत्याने दहशतवादी कारवाया सुरु आहेत. पण, भारतीय सैन दलाकडून या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यात येते. या कारवायांना पाकिस्तानकडूनच पाठबळ मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Exit mobile version