शेकापच्या प्रयत्नांना मोठे यश
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान मध्ये गरजेपोटी 2001पूर्वी बांधलेली घरे शासनाने विशेष अधिकार वापरून नियमित करावीत अशी मागणी अनेक वर्षे शेतकरी कामगार पक्षकडून केली जात आहे. या मागणीसाठी शेकापचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ती सर्व बांधकामे नियमित करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
राज्य सरकारच्या प्रचलित नियमानुसार झोपडपट्यातील 2001 पर्यंतची सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे कार्यादेश दिले होते.याच नियमाचा आधार घेऊन माथेरान गिरीस्थान नगरपरिषद मधील स्थानिकांनी स्वतःच्या गरजेपुरते बांधलेली घरे नियमित करण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.या मागणीसाठी माथेरान मधील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेकापचे आ.जयंत पाटील यांनी याबाबत विधान परिषदेत जोरदार आवज उठविला होता आणि त्यावेळी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते.त्यानुसार माथेरान मधील शेकापचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांची यांची भेट घेतली. त्यावेळी शेकाप माथेरान शहर चिटणीस शफिक शेख, उपाध्यक्ष उमेश कदम आणि सचिव रमाकांत तोरणे आदी उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी या प्रश्नावर सातत्याने विधानपरिषदेत आवाज उठवला अखेरीस राज्य सरकार दखल घ्यावी लागली. शिंदे यांनी आमदार जयंत पाटील यांना पत्र पाठवून राज्य सरकारच्या प्रचलित नियमावलीला अधीन राहून माथेरांनची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्याचे संकेत दिले. माथेरानचेे भूखंड हे महसूल व वन खात्याच्या मालकीचे आहेत. सण 2001 पर्यंतच्या अनधिकृत बांधकाम ची संख्या 173 असल्याचे उमेश कदम यांनी सांगितले. इंदिरा नगर ही शंभर वर्षांपूर्वी ची लोकवस्ती आहे तर पंचवटी येथील चाळीस वरश्यपूर्वी ची आहे त्यामुळे त्यांच्या वरचा अनधिकृतचा शिक्का पुसला जाणार अशी शक्यता निर्माण झाल्याने स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार संबंधित विभागाने बांधकामे नियमित करण्याच्या कामास तात्काळ सुरवात करावी अशी मागणी शहर चिटणीस शफीक शेख यांनी केली आहे.