ग्रामस्थ व तरुणांचा पुढाकार
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
एकीचे बळ गावात परिवर्तन शकते याचे ताजे उदाहरण म्हणजे वेळास येथील पाणीपुरवठा योजना. कोकण भागात सरासरी 100 ते 130 इंच पाऊस पडून सुध्दा काही खेडेगावांमधून पाण्याची टंचाई भासतेच. भविष्यात वेळास गावाला पाण्याची टंचाई जाणवू नये या हेतूने स्थानिक व तरूण पिढीच्या पुढाकाराने विहिरीसाठी जागा उपलब्ध करून पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. योजनेला पूर्णत्वास नेण्यासाठी वेळास गावातील तरुणांनी पुढाकार घेतला त्यांना गाव अध्यक्ष संदिप दिवेकर यांच्यासह गावातील ज्येष्ठ मंडळी, वेळास येथील स्थायीक पण व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्या मंडळींनी आर्थिक सहाय्य केले.
सदरच्या विहिरीसाठी जागा ही अंजली शंकर मोरे व परिवाराकडून उपलब्ध करून देण्यात आली. लोकसहभागातून होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेस दिवंगत रमेश शंकर मोरे पाणीपुरवठा योजना असे नामकरण करण्यात आले. या योजनेस पुणे स्थित चेतन पटवर्धन यांचे विशेष मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य लाभले. या कार्यक्रमास वेळास गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
- भविष्यात पाण्याची टंचाई वेळास ग्रामस्थांना भासू नये याच हेतुने आम्ही पाणीपुरवठा योजना ही साकारायची हे मनाशी ठरवले होते. -धवल तवसाळकर, ग्रामपंचायत सदस्य, वेळास.