घरांमध्ये घुसले पाणी

। पनवेल । वार्ताहर ।

कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोकरपाडा गावात जाण्या-येण्यासाठी असलेल्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे गावात नागरिकांना त्रास सहन करावा लागला. धो-धो कोसळत असलेल्या पावसामुळे येथील स्वप्ननगरी चाळीतील जवळपास 35 ते 40 घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. त्यामुळे घरातील वस्तूंचे नुकसान झाले. गेल्या दोन दिवस पडलेल्या पावासामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले होते. सर्वत्र पाणी साचल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा तलाठी यांनी केला आहे. त्यावेळी ग्रामस्थांनी मदत करत नागरिकांना धीर दिला.

Exit mobile version