आदिवासींचा पाणीप्रश्‍न मिटला

नरेश पाटील यांच्या पुढाकारातून मारली बोअरवेल

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील अनेक भागात नागरिकांना आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायत हद्दीतील श्री दत्त आदिवासी वाडीमधील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेत माजी रायगड जिल्हा परिषदेचे सभापती नरेश पाटील यांनी स्वखर्चातून बोअरवेल खोदून दिली. त्यामुळे या गावाची कायमची पाणीटंचाई नरेश पाटील यांच्या माध्यमातून दूर झाली आहे. श्री दत्त आदिवासीवाडीत 180 फुटांवर पाणी लागल्याने नरेश पाटील यांच्या सामाजिक बांधीलकीचे कौतुक होत आहे. पाणीसमस्या तर ही अनेकांच्या पाचवीला पुजलेली असताना, परंतु याकडे शासनाचे लक्ष नाही. जे शासनाने करायला हवे ते येथील काही समाजसेवक, लोकप्रतिनिधी आणि काही राजकारणी स्वतः पुढाकार घेऊन स्वखर्चाने करताना दिसत आहेत. श्री दत्त आदिवासी वाडी येथे नरेश पाटील यांच्या माध्यमातून बोअरवेल मारून दिल्याने येथील टंचाईची समस्या दूर होऊन भरउन्हाळ्यात ग्रामस्थांची तहान भागल्याने महिला व नागरिकांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे.

Exit mobile version