वंचित बहुजन आघाडीचा आमरण उपोषणाचा इशारा
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली सुधागडसह जिल्ह्यातील अनेक गावे व वाड्या उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या भीषण झळा सोसत आहेत. सुधागड तालुक्यातील दहीगाव बौद्धवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे गटविकास अधिकारी विजय यादव यांना निवेदन देण्यात आले आहे.काही दिवसांत येथील पाणी प्रश्न सुटला नाही तर 7 एप्रिलला महिला व ग्रामस्थांसह रिकामे हंडे घेऊन पंचायत समिती दालनासमोर आमरण उपोषण बसणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी तर्फे देण्यात आला आहे. गटविकास अधिकारी विजय यादव यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अमित गायकवाड, आनंद जाधव, राहुल गायकवाड, प्रशांत गायकवाड, मयूर गायकवाड, अनिकेत लोखंडे यासह नेते मंगेश वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.