मुख्यमंत्री अरविंद केजीवाल यांना कोरोनाची लागण
ओमिक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
राजधानी दिल्लीतील कोरोना आणि ओमिक्रॉन रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिल्लीमध्ये विकेंड कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत राजधानीत 4000 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.
या आठवड्यापासून वीकेंड कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. दिल्लीत शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत वीकेंड कर्फ्यू लागू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व सरकारी कर्मचार्यांना आता घरुन काम करावं लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना यामधून वगळण्यात आलं आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पत्रकार परिषद घेत निर्बंधांची माहिती दिली आहे.
दिल्लीत बस आणि मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरु राहीतल. तर खासगी कार्यालयांना 50 टक्के कर्मचार्यांनाच कार्यालयात बोलावता येईल अशी माहिती मनिष सिसोदिया यांनी जनतेला संबोधित करताना दिली आहे. काळजी करण्याचं काही कारण नसून मास्कलाच आपली ढाल करा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
दिल्लीत बस आणि मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरु राहीतल. तर खासगी कार्यालयांना 50 टक्के कर्मचार्यांनाच कार्यालयात बोलावता येईल अशी माहिती मनिष सिसोदिया यांनी जनतेला संबोधित करताना दिली आहे. काळजी करण्याचं काही कारण नसून मास्कलाच आपली ढाल करा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
यापूर्वी दिल्लीमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात वेगाने वाढणारी कोरोनाची रूग्णसंख्या लक्षात घेता कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याता आला होता. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारच्या सर्व कर्मचार्यांना घरून काम करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्यांनाच यातून सूट दिली जाणार आहे. तर, खाजगी कार्यालयातील कर्मचार्यांचीदेखील कार्यालयातील संख्या 50% वर आणण्यात येणार आहे.
कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता दिल्ली एम्सने हिवाळी सुट्ट्या (5 ते 10 जानेवारी) रद्द केल्या आहेत. एम्सने सर्व कर्मचार्यांना लवकरात लवकर कामावर परतण्यास सांगण्यात आले आहे. सोमवारी दिल्लीत कोरोनाचे 4099 नवीन रुग्ण आढळून आले असून राज्याचा सकारात्मकता दर आता 6.46% वर पोहोचला आहे.
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची छाया गडत होत चालली आहे. त्यातच आलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटने संसर्गाचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे अधिकच चिंतेत भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सरकारी कर्मचार्यांसाठी नवीन नियमाली जारी करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचार्यांची उपस्थिती 50 टक्के इतकीच ठेवण्यात यावी, उर्वरीत कर्मचार्यांना वर्क फॉर्म होम देण्यात यावे, असे नियमालीत केंद्र सरकारने म्हटले आहे.
मी करोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. सौम्य लक्षणं आहेत. घरातच स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावं आणि चाचणी करुन घ्यावी.
– अरविंद केजरीवाल