| रसायनी | वार्ताहर |
आपटा गावातील मारुती गणपती मंदिरासमोर रिक्षा व पिकअपचा अपघात झाला. या अपघातात महिलेचा मृत्यू तर तिघेजण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.24) घडली. राम भोईर हा लाडीवली ते आपटा असा रिक्षा चालवित जात होता. त्याची रिक्षा आपटा गावाच्या हद्दीत उभा गणपतीसमोर आली असता समोरुन भरधाव वेगाने पिकअप टेम्पो आला. त्यामुळे रामचा रिक्षाच्या वेगावरील ताबा सुटला. यामुळे रिक्षा पिकअप टेम्पोला धडकून पलटी झाली व अपघात घडला. या अपघातात राम भोईर, पुष्पा संतोष पवार, राजेश राम वाघे हे तीन जण जखमी झाले. तसेच मानसी मोहन वाघे यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यु झाला.
याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शंनाखाली पोलीस उपनिरीक्षक धोंडे अधिक तपास करीत आहेत.
.