पक्ष बळकटीकरणासाठी चांगले पाऊल: सुरेश खैरे

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मागील निवडणूकीत अपयश आले. मात्र शेतकरी कामगार पक्षाने जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरूच ठेवले. सहकार, खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत शेकापला चांगले यश मिळाले. पक्ष संघटनेत बदल करण्यासाठी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला. शेकाप नेते जयंत पाटील आणि माजी आ. बाळाराम पाटील यांनी संवाद मेळाव्यातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांनी दिला. तळागाळातील कार्यकर्ता ठामपणे शेकापसोबत आहे, हे या मेळाव्यांमधून दिसून आले आहे. संवाद दौऱ्यातून अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या आघाड्यांवर पदनियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तीन हजारहून अधिक पदांची निवड केली आहे. पक्ष बळकटीकरणासाठी हे सर्वांत चांगले पाऊल असून आगामी काळात पक्षवाढीसह पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचवून पक्षाला अधिक मजबूत करण्याचे काम पदाधिकारी, सदस्यांच्या माध्यमातून नक्की होईल, असा विश्वास आहे. पनवेलसह अन्य ठिकाणी रक्तदानसारखे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले जात आहे, त्याचा सार्थ अभिमान आहे, असे मत शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी अहवाल वाचनातून व्यक्त केले.

Exit mobile version