| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. उड्डाण पुलावरील संरक्षक कठड्याला धडकून दुचाकी थेट वीस फूट खाली पडल्याने दोन तरुणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी ( दि.1) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वैभव रामदास गमरे (28 ) आणि आनंद इंगळे (21) अशी या दोघांची नावे आहेत. अपघाताची माहिती मुंबई पोलिसांना समजताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या वैभव आणि आनंद या दोघांनाही पोलिसांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दुचाकी अपघातात तरुणांचा मृत्यू
![](https://krushival.in/grygrars/2022/08/road-accident-e1661076967793.jpg)