। मुंबई । प्रतिनिधी ।
सत्ता बदल होणार असा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. दरम्यान, राज्यात अजित पवारांची राष्ट्रवादी एकाही जागेवर विजयी होणार नाही, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
पुढे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही नुसत्या घोषणा करत नाही. 2019 मध्ये भाजपला प्रत्येक राज्यात किती जागा आल्यात हे पाहिलं तर कोणत्या राज्यात भाजपचा आकडा यंदा 2019 च्या तुलनेत वाढेल? भाजप दावा करतोय की, बंगाल आणि उत्तरप्रदेशात आमचा उमेदवार विजयी होईल. पण इतर ठिकाणी तुम्ही अव्वल आहात. त्यामुळे कुठे वाढणार याचा अंदाज नाही. आम्ही सांगू शकतो आम्ही कोणत्या जागा जिंकणार? कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजराज, तेलंगणा, हरियाणा, दिल्ली या जागा जिंकणार असल्याचा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तर, यावेळी राज्यात अजित पवार यांना शून्य जागा मिळणार असून बारामतीत सुनेत्रा पवार हरणार असल्याचा दावाही केला.