घाटमाथा ते पाटण रस्त्याची झाले भले मोठ्या खड्ड्यांसह चाळण
चिपळूण | संतोष पिलके |
चिपळूण ते कराड हा कोकण आणि घाट माथ्याला जोडणारा रस्ता नेहमीच वर्दळीचा वर्दळीचा असतो. या मार्गावरून रत्नागिरी जिल्ह्यातून दिवसातून शेकडो वाहने पश्चिम महाराष्ट्रात ये जा करत असतात. मात्र गेले अनेक कालावधीपासून चिपळूण घाटमाथा ते पाटण या मार्गावरील रस्त्याची अक्षरशःचाळण झाली आहे.रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. सदरचा रस्ता ह पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात येत आहे. हा रस्ता पाटण ते कोयनानगर च्या पुढे तब्बल 20 ते 25 किलोमीटर पूर्णतः खड्डेमय झाला आहे. आमदार शंभूराज देसाई हे सातारला वास्तव्य करत असल्यानेया रस्त्याची अवस्था त्यांना समजेल का ? त्यांचेपूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे का ? असा संतप्त सवाल येथून प्रवास करणारे प्रवाशी, स्थानिक नागरिक करत आहेत. या रस्त्यावरून प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्याचसोबत वाहनांची पूर्णतः वाट लागली जात आहे.
याबाबत अनेकदा सोशल मीडिया, वर्तमानपत्रे तसेच उपोषणे, मागण्या झाल्या मात्र या रस्त्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी,प्रशासनने पूर्णतः कानाडोळा केला आहे. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर पडलेले खड्डे पाण्याने पूर्णत: भरल्याने खड्ड्यांचा अंदाजच येत नसल्याने अनेकदा येथे वाहनांचे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यामुळे सदर रस्त्यावर प्रवास करणे अतिशय जिकरीचे बनले आहे. सदरचा महामार्ग हा कोकण ते घाटमाथा दरम्यान मालवाहतूक तसेच प्रवासासाठी कमी वेळेचा व कमी खर्चिक जरी असला तरी सध्याच्या रस्त्याच्या परिस्थितीमुळे हा मार्ग उलटपक्षी जास्त वेळेचा आणि प्रचंडखर्चिकझाला आहे.महाविकास आघाडीच्या सरकारमधील एक मंत्रीगण असलेले सदर मतदार संघाचे आमदार जर हा मार्ग व्यवस्थित करू शकत शकत नसतील तर यापेक्षा मोठा कोणता विकास ते करणार ? असा सवाल देखील येथील स्थानिक नागरिकांप्रमाणेच वाहनधारकां मधून केला जात आहे. याठिकाणी कधीही वाहन धारकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होऊन रास्ता रोको किंवा महामार्ग बंदचे आंदोलन होऊ शकते एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने त्वरित दखल घेऊन केवळ डागडुजी न करता रस्त्याचे मजबुतीकरण करावे अन्यथा नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल असा इशारा वाहनधारकांमधून दिला जात आहे.