राजस्थानात भीषण अपघातात 12 ठार

जयपूर | वृत्तसंस्था |
 राजस्थानमधील बाडेमर-जोधपूर महामार्गावर  खासगी प्रवासी बसला टँकरने धडक दिल्याने भीषण अपघात घडला. त्यात 12 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. बस बालोत्रा येथून सकाळी 9.55 वाजता निघाली आणि चुकीच्या बाजूने येणार्‍या टँकरने बसला धडक दिल्याने हा अपघात झाला.  टँकरची बसला धडक झाल्यानंतर बसला आग लागली. या बसमध्ये 25 प्रवासी होते, प्रशासनाला दहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मोठ्यासंख्येने पोलीस दल देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

Exit mobile version