आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा
। मुंबई । वार्ताहर ।
देशात करोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळले आहे. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. यातच 14 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान देशात सुमारे 25 लाख लग्न होत आहेत. यामध्ये एकट्या दिल्लीत सुमारे दीड लाख लग्न होत आहेत. किरकोळ व्यापार्यांची संघटना असलेल्या कॅटने हा अंदाज व्यक्त केला आहे. या लग्न समारंभांमुळे ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रुग्णसंख्येत घट आणि निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्याने आजकाल विवाहसोहळ्यांमध्ये करोना नियमांचं पालन होताना दिसून येत नाही. मास्क न लावता लोक मोकळेपणाने फिरत आहेत. पोलीस आणि प्रशासन देखील फारसे लक्ष देताना दिसून येत नाही. यातच गेस्ट हाऊस किंवा लग्न समारंभाच्या इतर ठिकाणी करोना नियमांचे पालन केले जात नसल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यात ही एक मोठी समस्या बनू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात एनडीटीव्हीने वृत्त दिलं आहे.
नी व्यक्त केली आहे. यासंदर्भात एनडीटीव्हीने वृत्त दिलंय.