अतिवृष्टीग्रस्तांना 365 कोटींची मदत; कोकणासाठी साडे आठ कोटी

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे. जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. ह्यात शेतपिकांचं मोठं नुकसान झाली. याच पार्श्‍वभूमीवर, दिलासा देत आता राज्य सरकारकडून शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना एकूण 365 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, सर्व यंत्रणांनी ही मदत तात्काळ बाधीतांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घावी, असे स्पष्ट निर्देश देखील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

विभागांनुसार मदतीचं वाटप
पुणे 150 कोटी 12 लाख रुपये, कोकण – 8 कोटी 51 लाख रुपये, अमरावती -118 कोटी 41 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख रुपये, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीमचं वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी जिल्ह्यांना वितरित करण्यास विभागीय आयुक्तांमार्फत मंजुरी देण्यात आली आहे.


विजय वडेट्टीवार, मंत्री

Exit mobile version