राज्यात वर्षभरात 75 हजार रिक्त पदे भरणार

। मुंबई । प्रतिनिधी ।

येत्या वर्षभरात 75 हजार शासकीय रिक्त पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी अखेरच्या दिवशी विधानसभेत केली. ते म्हणाले की, एमपीएससी तर्फे आकृतीबंधानुसार ही पदे भरण्यात येतील. तसेच जिल्हा निवड समित्यांतर्फे भरण्यात येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पन्नास टक्के पदे देखील भरण्यात येतील.

यासोबतच मराठा समाजातील तरुणांसाठी देखील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजातील तरुणांना आर्थिक दुर्बल गटामध्ये आरक्षित पदांवर नियुक्ती मिळणार आहे. तसेच भरती प्रक्रीयेमध्ये अनियमितता केलेल्या खासगी कंपन्याचा या प्रक्रियेमध्ये समावेश होणार नसल्याचे शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

Exit mobile version