। नृसिंहवाडी । प्रतिनिधी ।
पूरग्रस्त शेतकर्यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली परिक्रमा यात्रा काढण्यात आली. त्या आंदोलनास उदंड प्रतिसाद लाभला.राजू शेट्टी हे जलसमाधी आंदोलनावर ठाम असून,सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही,असे त्यांनी जाहीर केले. दरम्यान,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना सोमवारी दुपारी 3 वाजता मुंबईत वर्षा निवासस्थानी चर्चेसाठी पाचारण केले आहे.तसा प्रस्ताव प्रांताधिकार्यांनी सादर केला. नृसिंहवाडीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची पंचगंगा नदीत उडी मारली. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. रेस्क्यू फोर्सचे जवान आणि पोलिसांनी नदीत उड्या मारलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.