| नेरळ | वार्ताहर |
आपल्या भावासाठी वडिलोपार्जित जमिनीचा तुकडा न मागणार्या महिला भगिनी यांचा सन्मान करण्याचा पायंडा समाजासाठी अतिशय स्तुत्य आहे. त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ सुरू केलेली ही सेवा पांडुरंगाची सेवा आहे. त्यामुळे या उपक्रमाचे आचरण समाजाने केले पाहिजे असे आवाहन देहू मेंगाळ महाराज यांनी केले.
नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात स्व. सुरेखा मधुकर खडे आणि माणिक हिरू पाटील यांच्या स्मरणार्थ महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी चाफेवाडी मठाचे प्रमुख देहू महाराज मेंगाळ, परशुराम महाराज खंडवी, कीर्तनकार शिवराम महाराज तुपे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ह.भ.प. नागो गवळी, विजय महाराज पाटील, ह.भ.प. लक्ष्मण हजारे, उर्मिला हजारे, कर्जत पंचायत समिती माजी सभापती वासंती राणे, ह.भ.प. शांताराम धुळे, शंकर विरले, दत्तू विरले, सरपंच रमेश लदगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात कीर्तनकार अॅड ज्ञानेश्वरीताई घाटे यांनी प्रवचन सादर केले. तर समाजात आपल्या भावाकडून वडिलोपार्जित मिळकतीमधील वाटा न मानणार्या बहिणी यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. त्यात भाग्यवंत महिला मध्ये सीताबाई रामा पाटील, सुंदर किरण पाटील, रखमाबाई धुळे, लक्ष्मी धुळे, राजूबाई कोळंबे, द्रौपदी विरले, राधिका विरले, रतन वेहले, मनीषा बदे, सपना राणे, आशा ठोंगरे, अश्विनी ताम्हाणे, लक्ष्मी ठेंगरे, प्राची ठोंगरे, अश्विनी ठोंगरे, ज्योत्स्ना बदे, प्रिया डायरे, तारामती पाटील, आदी माऊलींचा सन्मान साडी-चोळी देऊन करण्यात आला. यावेळी करडे कुटुंबीयांचे वतीने भास्कर करडे, हरेश करडे, मीनाक्षी करडे आणि ज्योती करडे यांनी पुढाकार घेवून कार्यक्रम आयोजित केला. तर करडे कुटुंबियातील पंढरीनाथ करडे, मंगेश करडे, सदानंद करडे, नंदू करडे, दत्तात्रय विरले यांनी सहकार्य केले.
या प्रसंगी देहू मेंगाळ महाराज यांनी मार्गदर्शन करताना ज्यांनी आई वडिलांची सेवा केली त्यांनी साक्षात पांडुरंगाची भक्ती केली असे समजले जाते. करडे कुटुंब यांनी आमच्या चाफेवाडी येथील मठामध्ये हा सोहळा पार पडला होता. त्यामुळे नेरळ येथे आम्ही आलो असून त्यांनी समाजासाठी वेगळा पायंडा पाडला असून समाजाने त्यांनी सुरू केलेलं कार्य हे घ्यायला हवे असे आवाहन करून मेंगाळ महाराज हा सोहळा आदर्श निर्माण करणारा सोहळा आचरणात आणावा असाच आहे असे कौतुक त्यांनी केले. आई वडिलांची सेवा केली पाहिजे आणि तो आदर्श करडे कुटुंबाने निर्माण केला आहे असे कार्य सर्व समाजाने कौतुक करायला हवे असे आवाहन केले. प्रवचनकार कीर्तनकार शिवराममहाराज तुपे यांनी मार्गदर्शन करताना सर्वांनी कुळ वाचविण्यासाठी माय माऊलीचा सन्मान महत्वाचा आहे, त्यासाठी आजचा हा सोहळा महत्वाचा असून कोण किती जगले यापेक्षा कसे जगले हे महत्वाचे असते. तसे आचरण करडे कुटुंबाने समाजात वेगळी प्रथा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. धर्म टिकवण्यात महत्वाचे असलेल्या भगवंत यांनी दिलेला शब्द महत्वाचा असून तो शब्द टिकविण्यासाठी प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे असे आवाहन केले. प्रत्येक माणूस हा सुखाच्या शोधात असतो आणि त्यावेळी सुख शोधताना कधी कधी आपल्या हातातून चुका होतात आणि आपले जीवन व्यर्थ ठरते. असे कार्य न करता सत्क्रमाने जगावे असे आवाहन तुपे महाराज यांनी केले.