। अलिबाग । वार्ताहर ।
सध्या लहानमोठ्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. वाहन चालकांचा बेदारकपणा या सगळ्याला कारणीभूत ठरत आहे. 30 ऑक्टोबर रोजी खालापुर टोलनाक्याजवळ दोन अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खालापुर टोलनाका येथे दि. 30 ऑक्टोबर रोजी आरोपित रा.पडारीया, पो.बरसो ,तहसिल-बर्ही, जिल्हा -हजारीबाग,राज्स- झारखंड हा त्याच्या ताब्यातील ट्रक क्र.एमएच-46/बीबी/2600 हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने पुणे लेनवरून चालवित असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापुर टोल नाक्याजवळ पुणे लेनमध्ये आलेवेळी त्याने ट्रक अविचाराने चालवून त्याच्या ट्रकच्या पुढे चालणा-या स्विफ्ट डिझायर कार क्र.एमएच-03/सीपी/6864 ला पाठीमागून ठोकर मारुन अपघात केला. या अपघातात कारमध्ये बसलेल्या साक्षीदारांना लहान मोठया दुखापती होऊन वाहनाचे काही प्रमाणात नुकसाान झाले आहे. तसेच आरोपित रा.न्यु इंद्रानगर जोगेश्वरी ईस्ट मुंबई याने समोरील टाटा नॅनो कार क्र.एम एच02 बी डब्ल्यू 1397 हीस मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ने खालापूर टोल नाका येथून जात असताना गाडी चालकाने गाडीचा वेग कमी केला असता त्यावेळी पाठीमागून येणारी इरटिगा कार क्र.एम एच 04 जी यू 5609 या कारने फिर्यादी रा.3/303 दादरकर आर्केड एन.एल परळकर मार्ग परळ व्हिलेज मुंबई यांच्या कारला ठोकर मारून कारच्या पाठीमागील भागाचे नुकसान केले. सदर दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना दि.30 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोह/775 श्री. सावंत हे करीत आहेत.