। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
शेतकर्यांचा आणि विरोधकांचा विरोध झुगारून संसदेतील संख्याबळाच्या जोरावर केंद्रीतील मोदी सरकारनं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकर्यांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण होतंय. दरम्यान, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हे कायदे माघारी घेण्याची घोषणा करण्यात आली असली तरी शेतकर्यांनी सरकारवर अविश्वास दाखवत आपलं आंदोलन सुरूच ठेवलंय.आंदोलनाच्या वर्षपूर्ती निमित्तानं दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा शेतकरी गोळा झालेले दिसून येत आहेत.