अतिशय कणखर अभ्यासू आणि लढाऊ नेतृत्व हरपले. कायम मूल्यांची विचाराची कास धरून चालणारे असे दुर्मिळ राजकीय नेते ही त्यांची ओळख होती. अन्याय अत्याचार विरोधी कठोर भूमिका, स्पष्ट मांडणी व प्रश्न हाताळण्याचे कसब हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आमच्या सारख्या अनेक कार्यकर्त्याना ते पितृतुल्य होते. त्यांच्या प्रेमळ व आश्वासक आधाराला आम्ही मुकलो आहोत.