मार्च अखेरपर्यंत 160.70 कोटी वसूल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट सन 2021-22 करिता 202 कोटी70 लाख रुपये महसूल वसुलीचे निश्चित करण्यात आले असून, त्या तुलनेत मार्च 2022 अखेरपर्यंत 160कोटी 70 लाख रुपये महसूल वसुली करण्यात गौण खनिज विभागाला यश आले आहे.
सन 2021 -22 अखेरपर्यंत गत 160 कोटी 70 लाख रुपये (79.44 टक्के) गौण खनिज महसूल वसुली करण्यात आली आहे. गौण खनिज स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) आणि अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीपोटी दंडात्मक कारवाईतून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील वाळू, गिट्टी, मुरूम व माती इत्यादी गौण खनिजाचे स्वामित्वधन शुल्क आणि गौण खनिजाचे अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीसंदर्भात दंडात्मक कारवाईतून 2021-22या वर्षात 202 कोटी70 लाख रुपये महसूल वसुली उद्दिष्ट जिल्हा खनिकर्म विभागाला देण्यात आले आहे.
या उद्दिष्टाच्या तुलनेत मार्च2022 अखेरपर्यंत या आठ महिन्यांच्या कालावधीत 160कोटी 70 लाख रुपये (79.44 टक्के) गौण खनिज महसूल वसुली करण्यात आली आहे. त्यामध्ये गौण खनिजाच्या स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) आणि गौण खनिजाचे अवैध उत्खनन व अवैध वाहुकीपोटी दंडात्मक कारवाईतून वसूल करण्यात आलेल्या रकमेचा समावेश आहे. अखेरपर्यंतच गौण खनिजाची महसूल वसुली फक्त 79.44 टक्क्यांवर पोहोचल्याने जिल्हा खनिकर्म विभागाचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले आहे. असल्याची स्थिती आहे. जिल्हास्तरीय धाड पथकाने 192 कारवाईतून एक कोटी 53लाख 9 हजार220 रुपये वसूल!
गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार जिल्हा खनिकर्म अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आकस्मिक धाड पथक गठित करण्यात आले होते. या पथकामार्फत गत वर्षात गौण खनिजाच्या अवैध 192 अवैध उत्तखननावर कारवाई दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दंडात्मक कारवाईतून एक कोटी 53लाख 9 हजार220 रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे.
गौण खनिज महसूल वसुली उद्दिष्टाच्या तुलनेत नोव्हेंबर अखेरपर्यंत 79.44 टक्के महसूल वसुली करण्यात आली असून, जिल्हास्तरीय आकस्मिक धाड पथकाने गौण खनिज अवैध वाहतूक संदर्भात केलेल्या दंडात्मक कारवाईतून एक कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे.गेले दीड वर्ष कोरोनाच्या महामारीत गेले, मात्र तरीही जिल्ह्याला मोठे उद्दिष्ट शासनाकडून मिळालेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. -आर. आर. मेश्राम, जिल्हा खनिकर्म अधिकारी, रायगड