| उरण । वार्ताहर ।
स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 9 ते 15 ऑगस्टदरम्यान राज्यभर आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघणार असून काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्यांसह, नागरिकांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उलवे येथील पत्रकार परिषदेत केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम करण्यात येणार आहे.