| भाकरवड | वार्ताहर |
काळ, वेळ कोणासाठी थांबत नाही, जर आपण परमेश्वर भक्तीत असू, तर जीवन साध्य करु शकू, असे विचार दिनेश महाराजांनी व्यक्त केले. अलिबाग तालुक्यातील आंबेपूर लक्ष्मीनगर येथे स्व. सुनंदा मोरेश्वर पाटील यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमानिमित्ताने शुक्रवार, दि 21 ऑक्टोबर रोजी एकादशीच्या (हरी दिनी ) कीर्तनकार रायगड भूषण दिनेश महाराज पाटील डोळवी यांनी कीर्तन सादर केले.
यावेळी पेझारी आंबेपुर शहापूर पंचक्रोशीतील जवळपास दोनशेहून अधिक भाविक भक्तगणांनी कीर्तनरुपी सेवेचा आस्वाद घेतला. यांना साथरूपी संगत पंचक्रोशीतील गावच्या वारकरी संप्रदाय मंडळी यांनी केली. तर मृदुंगाची साथ श्रेयश म्हात्रे यांनी केली. प्रथम नववा व बारावा अध्याय वाचन करून त्यानंतर आपल्या कीर्तनसेवेत दिनेश महाराज यांनी काळावर विवेचन केले. काळ वेळ कुणासाठी थांबत नाही. जर आपण चिंतनामध्ये, परमेश्वर भक्तीत असू तर आपले जीवन साध्य करू शकतो, असे म्हटले.