| कर्जत । वार्ताहर ।
कर्जतच्या अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेमध्ये 1975 साली अकरावी मॅट्रिकला असणार्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर आयोजित केले होते. या गेटटुगेदरला आलेले काही माजी विद्यार्थी तब्बल अठ्ठेचाळीस वर्षांनी म्हणजे चार तपांनी एकमेकांना भेटले. जुन्या मॅट्रिकला असलेल्या माजीविद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तालुक्यातील पोसरी येथील वसंत फार्म हाऊस मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी बहुतांश मित्र निवृत्त झाल्याने ते आवर्जून उपस्थित होते.
यावेळी धनंजय चाचड, बाळू तवळे, तानाजी बैलमारे, प्रभाकर खैरनार, अरुण गुरव, विजय मांडे आदी उपस्थित होते. प्रत्येकाने आप आपला परिचय करून देतांना जीवनातील बर्या – वाईट प्रसंगांची माहिती मनमोकळेपणे सांगून उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेतला. या प्रसंगी रवींद्र खराडे, गजानन काळे, जयंत लेले, विनायक भागवत, सुहास लेले. संजय परदेशी, बिपीन गडकरी, दिगंबर कांबळे, वासुदेव बैलमारे, केशव बडेकर, राजेंद्र दानवे, दीपक वैद्य, शेखर शेजवलकर, सुहास खाडे, विद्याधर गुजराथी, तानाजी घाडगे, शेखर कशेळीकर, बाळू थोरवे, गजानन बडेकर, जगन्नाथ जाधव, गोपीनाथ देशमुख, शिवा भालेराव आदींसह बहुसंख्य वर्गमित्र उपस्थित होते.