कशेडी घाटात कारने घेतला पेट

आठ प्रवासी बचावले

| पोलादपूर | प्रतिनिधी |

कशेडी घाटामध्ये पोलादपूरच्या दिशेने निघालेल्या रेनॉट लॉजी कारने अचानक पेट घेतला. काहीच क्षणात कारला ज्वाळांनी चहूबाजूंनी लपेटले. यावेळी कारमधून गणपतीपुळे ते कोपरखैरणे असा प्रवास करणारे जोडपे सुदैवाने बचावल्याची माहिती कशेडी येथील वाहतूक पोलीस उपनिरिक्षक ए.पी.चांदणे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.

बुधवारी (दि.3) सकाळी साडेबारा वाजता कशेडी घाटात स्वामी समर्थ कशेडीमठाखालील बाजूला गणपतीपुळे ते कोपरखैरणे नवी मुंबई सेक्टर 10 अशी रेनॉट लॉजी कार चालवित (एमएच-43-इडब्ल्यू-0710) चालक मालक विष्णू सर्जेराव गरजे हे पत्नी प्रतिभा व अन्य 8 असे कार मधून जात असताना कारच्या बॉनेटमधून धूर येऊ लागल्याने सर्व प्रवासी गाडीमधून उतरून बाजूला थांबले. त्याचवेळी गाडीने चहूबाजूने पेट घेतला. यावेळी काही वेळातच गाडी संपूर्ण जळून खाक झाली आणि गाडीचे 100 टक्के जळून नुकसान झाले. खेड पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक गडदे व सहकारी यांनी समक्ष येऊन कारवाई केली. दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास कशेडी टॅप वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर दीड वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आली. मात्र, संपूर्ण रेनॉट लॉजी कार जळून खाक झाली होती.

Exit mobile version