डॉ. बाबासाहेब देशमुख यांची टीका
| सांगोला | प्रतिनिधी |
मोदी सरकारच्यावतीने नुकताच सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा भांडवलदारांना पोसणारा दिशाहीन अर्थसंकल्प असल्याची टीका शेकापप्रणित पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी अर्थसंकल्पाचे करताना गेल्या सात-आठ वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक घोषणा केल्या. तसेच याच कालावधीमध्ये अनेक अर्थसंकल्प सादर केले. पण अपवाद वगळता फारसा बदल दिसून आला नाही ही वास्तव परिस्थिती आहे. संपूर्ण भारतामध्ये शेतकरी मजूर भूमिहीन शेतमजूर,कामगार कारागीर, महिला भगिनी यांचे प्रश्न गेल्या सात आठ वर्षांमध्ये जसेच्या तसे आहेत ही विदारक स्थिती भारतामध्ये असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
मोदी सरकारने या सात आठ वर्षांमध्ये सत्तेवर असताना अनेक घोषणा केल्या. अनेक योजनाची घोषणा केली. उदा-अटल पेन्शन योजना,मुद्रा लोन योजना, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, कौशल्य विकास योजना, दीनदयाल उपाध्याय योजना, पंतप्रधान कौशल्य योजना, अशा एक ना अनेक योजनांची घोषणा केली.परंतु एकाही योजनेची तसा प्रभाव भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विशेषत: दिसून आलेला नसल्याचेही त्यांनी सुचित केले.
आजही सर्वसामान्य जनता महागाईने होरपळली आहे, सध्याच्या महागाईचा दर 9.02 एवढा आहे. सर्वसामान्य लोकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. स्वतःच्या गरजा भागवणे मुश्किल झाले आहे. कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या रोगाने अक्षरशः भारतीय अर्थव्यवस्थेचा चुरडा झाला आहे. अनेकांचे छोटे-मोठे नष्ट झाले. भारतातील 43% लोकांचे हक्काच्या नोकर्या गेलेल्या आहेत. शेतकर्याला हमीभाव नाही. याच सरकारने 2022 पर्यंत शेतकर्याचे उत्पन्न दुप्पट करतो अशी घोषणा केली होती.परंतु ही घोषणा सपशेल पोकळ ठरली असल्याची टीकाही देशमुख यांनी केली.
भारतामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. दररोज बळीराजा कर्जबाजारीला कंटाळून आपले आयुष्य संपवतो आहे. विशेषत: गेल्या सहा महिन्यांमध्ये 387 शेतकर्यांनी आपली जीवन यात्रा संपवली. याला जबाबदार कोण? यावर अर्थसंकल्पात विशेष अशी तरतूद नाही. छोटे मोठे कारागीर, व्यापारी बांधव,गलाई कामगार, असंघटित कामगार, यांच्या दिवसेंदिवस गंभीर समस्या बनत चालले आहेत.नोकरीची गॅरेंटी आणि खात्री नाही.आपले जीवन मुठित धरून जगावे लागते. भारतामध्ये सरासरी लोकांचे दरडोई उत्पन्न कमी झालेला त्यांनी राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.
2022/23 या अर्थसंकल्पात सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ भांडवलदारांना डोळ्यासमोर ठेवून, बडे-बडे उद्योगपती यांना संरक्षण व आर्थिक सुबत्ता निर्माण करणारा श्रीमंताला अधिक श्रीमंत बनवणारा व भारत मातेच्या उदरात राहणार्या असंख्य भारतीयांच्या गळा घोटणारा हा अर्थसंकल्प आहे. या भारतातील शेतकरी,कामगार,शेतमजूर, कष्टकरी,भूमिहीन शेतकरी, पशुपालक,छोटे मोठे व्यापारी, कामगार,असंख्य असंघटित कामगार,यांची निराशा करणारा हा दिशाहीन अर्थसंकल्प आहे.असे ते म्हणाले.