पेंढ्यांच्या माचाला आग

| बोर्लीपंचतन । प्रतिनीधी ।
पावसांचा हंगाम जवळ आला आहे म्हणून शेतकर्‍यानी गुरा ढोरांसाठी पेढ्यांची वैरण भरुन ठेवली आहे. परंतु आज पुन्हा एकदा पेंढ्याच्या माचाला अचानक आग लागल्याने जवळ जवळ दहा हजार पेंढा आगीत भस्मसात झाल्याचे शेतकरी किशोर नाक्ती यांचे म्हणणे आहे. नाक्ती यांचा शेती, व दुग्ध व्यवसाय आहे. याचे वरच त्यांचा कुटुबाचा उदार निर्वाह होत असतो. अशा प्रकारच्या अकस्मात आगी लागण्याचे प्रकार वाढतच आहेत याला आळा बसण्या साठी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे लक्ष घालावे व शासनानेअर्थीक मदत करावी अशी मागणी होत आहे.

Exit mobile version