बंदरात मच्छिमारांची होडी उलटली; दोघांचा मृत्यू

| सिंधुदुर्ग | वृत्तसंस्था |

वेंगुर्ला बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ व अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लॉन्चवर जाण्यासाठी निघाले होते. मात्र, नऊ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली.

वेंगुर्ला बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ व अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लॉन्चवर जाण्यासाठी निघाले होते. मात्र, नऊ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली. यात 2 खलाशी बेपत्ता झाले असून अन्य दोघांचे मृतदेह सापडले आहेत. बाकी तिघांनी पोहून किनारा गाठला आहे. मात्र, दोन खलाशी अद्याप पर्यंत सापडलेले नाहीत. ही घटना गुरुवारी (दि.23) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास समुद्रात घडली आहे. ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला असावा, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. यातील 1 खलाशी रत्नागिरीतील तर 3 खलाशी मध्य प्रदेशातील असल्याचे समजते.

रात्री वादळी वाऱ्याबरोबरच वीज खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. त्याच अंधाऱ्या रात्रीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. तात्काळ अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले. मात्र, रात्री 12 वाजेपर्यंत त्यांचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही. आज सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत बुडालेली होडी आणि चारही खलाशांचा पत्ता लागलेला नाही. वेंगुर्ले पोलीस आणि स्थानिक मच्छीमार अजूनही शोध कार्य करत आहेत.

Exit mobile version