तळा | वार्ताहर |
कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्याचा मधुघट आयोजित अभिवाचन कार्यशाळा व कवी संमेलन हा उपक्रम निश्चितच स्तुत्य व कौतुकास्पद आहे, असे विचार केंद्रीय संमेलन प्रमुख कोमसापचे रायगड भूषण सुधीर शेठ यांनी व्यक्त केले.
ते कोकण मराठी साहित्य परिषद शाखा आणि साहित्याचा मधुघट यांनी पुस्तकरित्या आयोजित केलेल्या इंदापूर येथील अभिवाचन कार्यशाळा व कवी संमेलन या उद्घाटन समारंभप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी दक्षिण रायगड कोमसापचे अध्यक्ष संजय गुंजाळ हे होते. तर, विचार मंचावर जिल्हा समन्वयक अवि जंगम, तळा शाखा संस्थापक रायगड भूषण पुरुषोत्तम मुळे, तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के, कार्याध्यक्ष संदीप जामकर, मुख्याध्यापक श्री. लावन, सचिन विजय पवार, सिद्धेश लखमदे, उपाध्यक्ष भरत जोशी, धनंजय गद्रे, प्रकाश बागडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रथम सत्राचे सूत्रसंचालन अजय शेळके यांनी, तर द्वितीय सत्राचे हेमंत बारटक्के यांनी केले. तर, आभार प्रदर्शन कविवर्य अपर्णा जंगम यांनी केले.