| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा इतिहास मोठा आहे. याच स्टेडियमवर 2011 मध्ये भारतीय संघाने एक दिवसीय विश्वचषक जिंकला होता. मात्र, आता मुंबईमध्ये नवे स्टेडियम बांधण्याबद्दल विचार केला जात आहे. हे नवे स्टेडियम वानखेडे स्टेडियमच्या चौपट मोठे असून आसन क्षमता वानखेडे स्टेडियमपेक्षा चार पटीने जास्त असणार आहे. सध्या मुंबईला मॉडर्न स्टेडियमची आवश्यकता आहे. एक असे स्टेडियम जिथे जास्त प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था असेल. वानखेडे स्टेडियम ऐतिहासिक आहे, मात्र शहराला आता 1 लाख आसन क्षमता असलेल्या स्टेडियमची गरज असल्याचे बोलले जात आहे.