• Login
Saturday, March 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

इंडिया आघाडीला धडा

Krushival by Krushival
December 3, 2023
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
एका उद्दामाचा मृत्यू
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दहा साखळी सामने जिंकूनही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. अशा महत्वाच्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलिया आपली कामगिरी उंचावतो व टिच्चून खेळतो असे म्हटले जाते. तेच भाजपबाबतही खरे आहे. कोणत्याही निवडणुका ते जोरात लढतातच, पण काही निवडणुका ते अधिक हिरिरीने लढतात. तेच यावेळी दिसले. निवडणुका पाच राज्यांच्या असल्या तरी सर्वांचे लक्ष तीन हिंदी राज्यांवर अधिक होते. आणि, या तीनही राज्यांत भाजपने काँग्रेसला धूळ चारली आहे. राजस्थानमध्ये आपला पराभव होऊ शकतो हे खुद्द राहुल गांधी यांनीच एकदा जाहीर केले होते. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सहज जिंकेल असे तिच्या विरोधकांनीही वाटत होते. तर मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसला अनुकूल वातावरण असून भाजपची सत्ता जाणार असा तर्क माध्यमांमधून केला जात होता. मतदानोत्तर चाचण्यांमध्येही हेच म्हटले गेले होते. राजस्थानात गोष्टी अपेक्षेनुसार घडल्या. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील पराभव मात्र काँग्रेसलाच नव्हे तर राजकीय निरीक्षकांनाही हादरा देणारा ठरला. शिवराजसिंग चौहान यांच्याविषयी जनतेत मोठी नाराजी आहे असा एक सार्वत्रिक समज होता. गेल्या वेळी काँग्रेस विजयी झालेली असताना भाजपने फोडाफोडी करून आपले सरकार आणल्याने लोकांमध्ये काँग्रेसविषयी सहानुभूती आहे असे काहींचे म्हणणे होते. काँग्रेसला यंदाच्या प्रचारात जो प्रतिसाद मिळत होता त्यावरून ते खरे असावे असा बहुतेकांचा समज झाला. पण सभांमधील गर्दी आणि मतदान यांचा थेट संबंध नसतो हे पुन्हा एकवार दिसून आले. महिलांना थेट पैशांची मदत देणारी लाडली योजना, प्रेमळ मामा अशी प्रतिमा आणि फार मोठे भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहारांचे आरोप नसणे या चौहान यांच्या जमेच्या बाजू ठरलेल्या दिसतात. याउलट, कमलनाथ आणि दिग्विजयसिंग यांनी साधूमहाराजांचे सत्कार इत्यादी बरेच हिंदुत्ववादी चाळे केले. पण शेवटी ते अयशस्वी ठरले.

चौहानांचा मोदींना धक्का
शिवराजसिंह चौहान यांची प्रतिमा मवाळ अशी आहे. नरेंद्र मोदींना आव्हान देणाऱ्या सुषमा स्वराज यांचे ते समर्थक होते. यंदा त्यांना डावलण्याचा भरपूर प्रयत्न झाला. उमेदवारांच्या पहिल्या यादीत चौहान यांचे नाव नव्हते. अमित शाह आपल्या भाषणात त्यांचा उल्लेख करीत नसत. पुढचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव जाहीर करण्याचे भाजप नेत्यांनी टाळले. पण शेवटी काँग्रेस भारी पडते आहे असे वाटल्यावर चौहान यांना पूर्ववत प्रसिध्दी दिली जाऊ लागली. त्यामुळे मध्य प्रदेशातील यश हे मोदींइतकेच चौहान यांचेही आहे व चौहान यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेला हा हलकासा धक्का आहे असे म्हणावे लागेल. राजस्थानात देखील भाजपने वसुंधराराजे यांना बाजूला ठेवले. त्यांच्या अनेक समर्थकांना नाइलाजाने उमेदवारी दिली. मात्र तेथे विद्यमान काँग्रेस सरकारविरुध्द बोलायचे असल्याने मोदी व शाह यांच्यासाठी प्रचार सोपा होता. तेथे भाजपने कन्हैय्यालाल नावाच्या तरुणाच्या मुस्लिमांकडून झालेल्या हत्येचा मुद्दा बराच लावून धरला व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भावना भडकावण्याचा प्रयत्न केला. त्याचा त्यांना चांगला उपयोग झालेला दिसतो. छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या काँग्रेस सरकारबद्दलचे जनमत चांगले होते. शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतच्या किंवा महिलांसाठीच्या त्यांच्या योजनांची तारीफ झाली होती. पण शेवटच्या टप्प्यात महादेव एपचे प्रकरण काढून बघेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्याकामी ईडीचा वापर केला गेला. त्याचा थोडा फटका त्यांना बसलेला दिसतो. वास्तविक या राज्यात भाजपकडे सशक्त नेता नव्हता. प्रचारात मोदी व शाह हे अग्रेसर होते. तरीही भाजपने अनपेक्षित विजय खेचून आणला. या तीनही राज्यांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून संस्थानिकांचा वरचष्मा आहे. ग्वाल्हेर, इंदूर, जयपूर, जोधपूर इत्यादी भागातील संस्थानिकच नंतर राजकीय नेते झाले. यांचा कल पूर्वापार जनसंघ व भाजपकडे होता. त्यामुळे भाजपची या भागात चांगली मुळे रुजलेली आहेत. त्यामुळेच सत्तेतून गेला तरी भाजप येथे जनतेतून नाहीसा होत नाही.

दक्षिण अजून दूरच

आज काँग्रेस हरलेली असली तरी हीच गोष्ट काँग्रेसबाबतही खरी आहे. या तीनही राज्यांमध्ये जागा घटल्या असल्या तरी काँग्रेसला सुमारे चाळीस टक्क्यांच्या आसपास मते मिळालेली आहेत. हा मतदार अधिक बळकट करणे आणि भाजपचा मतदार आपल्याकडे वळवणे यासाठी त्या पक्षाला पुढच्या काळात प्रयत्न करावे लागतील. एकेकाळी आंध्र प्रदेश हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तेलंगणाच्या निर्मितीनंतर काँग्रेस संपल्यात जमा झाली. पण त्या पक्षाचा मतदार संपलेला नव्हता. तोच मतदार काँग्रेसकडे परत आल्यानेच चंद्रशेखर राव यांच्या पक्षाची मोठी पीछेहाट झालेली दिसते. राव यांच्या रयतु बंधू योजनेमुळे श्रीमंत शेतकऱ्यांना अधिक फायदा झाला अशी तक्रार होती. तसेच सरकारी नोकरभरती थांबल्याने तरुण अस्वस्थ होते. त्याचा फटका त्यांना बसला. तेलंगणात खरी लढत बीआरएस व आपल्यात आहे असे भासवण्याचा भाजपचा प्रयत्न पूर्णपणे तोंडावर आपटला आहे. प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी हे मूळचे काँग्रेसचे नाहीत. पण तरीही काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यावर भरवसा टाकला व इतर नेत्यांनी त्यांना मारुन मुटकून का होईना पण साथ दिली. कर्नाटकापाठोपाठ भाजपचा हा दुसरा मोठा पराभव असल्याने दक्षिण भारत भाजपसाठी अजूनही अप्राप्यच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर भारतातील हिंदी प्रदेश आणि दक्षिणेकडील राज्ये यांच्यात असलेली राजकीय मतभेदाची रेषा स्पष्ट झाली आहे. गायपट्ट्यावर भाजपचे वर्चस्व असले तरी दक्षिणेतील पुढारलेली, अधिक साक्षर आणि अधिक सधन राज्ये भाजपला लांब ठेवू पाहत आहेत असा संदेश या निकालाने दिला आहे. या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी मतदारांना अनेकानेक फुकट गोष्टींची आमिषे दाखवली होती. त्यापैकी कोणत्या आमिषांचा विजय झाला याचा तौलनिक अभ्यासच करावा लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवणे हे विरोधकांसाठी आता अधिक कठीण होईल. इंडिया आघाडीला आपल्या डावपेचांची नव्याने आखणी करावी लागेल. काँग्रेसला इतर पक्षांना अधिकाधिक बरोबर घेऊन चालावे लागेल. आघाडी टिकवून एकसंधपणे काम करावे लागेल.

Related

Previous Post

‌‘उज्ज्वला’च्या हाताला चटके

Next Post

रेवस जेट्टीच्या कामात दिरंगाई

Krushival

Krushival

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
रेवस जेट्टीच्या कामात दिरंगाई

रेवस जेट्टीच्या कामात दिरंगाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?