रेल्वेच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनीनजीकच्या सारसई गावाजवळील रेल्वे रुळावरून शौचास जाणाऱ्या तरुणाला रेल्वेची धडक लागून तरच मृत्यू झाल्याची घटना घडली. अविनाश बाणासुर पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण सारसई येथील राहणार असून तो आपटा येथील सिराज मुल्ला यांच्या विटभट्टीवर राहत होता. हा तरुण दारूच्या नशेत रेल्वे रुळावर शौचास गेला होता.

यावेळी पेणकडून पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वेची तरुणाला ठोकर बसली. या अपघातात तरुणाला गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version