नेरळ- कळंब रस्त्यावर ४१ वर्षीय तरुणाचा अपघात

तरुण जागीच ठार
। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील नेरळ- कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर रात्री एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. वरई गावातील हा तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला होता आणि सकाळी त्याबाबत माहिती मिळाली.
मानिवली ग्रामपंचायत मधील सचिन बाळू जाधव हा ४१ वर्षीय तरुण ड्रायव्हर म्हणून नोकरी करीत असून आपल्या घरातून काही कामासाठी दुचाकी घेऊन निघाला होता. २६ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास निघालेला हा तरुण एमएच ४३-एस ९७२० या दुचाकीवरून घरातून निघाला आणि रात्री परत आला नाही त्यामुळे घराची मंडळी आणि वरई ग्रामस्थ काळजीत होते. आज २७ एप्रिल रोजी सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी अवसरे गावाच्या समोर असलेलया स्वामी समर्थ मठाच्या बाजूला शेतामध्ये एक तरुण निपचित पडला असल्याची माहिती वरई गावात पोहचली आणि त्यावेळी तो तरुण सचिन बाळू जाधव असल्याचे निष्पन्न झाले.दुसरीकडे दुचाकी देखील शेतात कोसळलेली असल्याने रस्त्याने प्रवास करणारे यांना कोणतीही माहिती मिळाली नव्हती.
नेरळ पोलिसांनी सचिन बाळू जाधव यांचा मृतदेह नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.मात्र तेथील एमबीबीएस डॉकटर हे रजेवर असल्याने पोलिसांनी मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेनाय्त आला आणि तेथे शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला.नेरळ पोलीस ठाणे येथे सचिन बाळू जाधव यांच्या मृत्यूची नोंद आकस्मित मृत्यू अशी करण्यात आली आहे.

Exit mobile version